मावळ ऑनलाईन – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, (Talegaon Dabhade)फ्रेंड्स ऑफ नेचर असोसिएशन व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा तळेगाव दाभाडे मावळ यांचे संयुक्त विद्यमाने तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष, तीनही संस्थांचे मार्गदर्शक सुरेश धोत्रे यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या प्रांगणात १२ फूट उंचीची ६१ झाडे लावून भव्य वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला.
जगामध्ये वाढती लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने ऑक्सिजनची गरज पाहता आज वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी करताना मानवी जीवनात वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे हे नमूद करताना तीनही संस्थांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले तर “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा अर्थ विश्लेषण करत वृक्ष लागवड करणे व त्यांचे संगोपन करणे याची आजच्या काळात नितांत गरज आहे त्यासाठी” झाडे लावा झाडे जगवा” हा उपक्रम सामाजिक संस्थांनी राबवावा असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना रामभाऊ परुळेकर शाळेचे माहिती व उपक्रमाचा हेतू विशद केला.

या प्रसंगी रोटरी सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष डाॅ.गणेश सोरटे, नाट्य परिषद मुख्य कार्यवाह विश्वास देशपांडे, बालमोहन संस्थेचे विश्वस्त नंदन रेगे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुहास गरुड, इंदोरीचे माजी सरपंच प्रशांत भागवत,संजय मेहता, नितीन शहा,संजय वाडेकर,राजेश बारणे यांनी उपक्रमास व सुरेश धोत्रे यांना मनोगताद्वारे शुभेच्छा दिल्या.
Ajit Pawa: पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
Nutan Maharashtra Engineering : आधुनिक उद्योगांवर आर्टिफिशियल इंटेलिजंसचा सकारात्मक परिणाम – डॉ. दीपक शिकारपूर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी केले,सूत्रसंचालन परुळेकर शाळेचे पर्यवेक्षक दत्तात्रय जोशी यांनी केले सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक फोंडके सर व अध्यापिका भारती धोत्रे यांनी केले.रोटरी सिटीचे व नाट्य परिषदेचे डायरेक्टर डॉ. मिलिंद निकम यांनी आभार मानले. हरित सेना प्रमुख रुचिरा बासरकर, खुडे सर व हरित सेनेचे विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
संग्राम जगताप,आनंदराव रिकामे, वैशाली लगाडे, रघुनाथ कश्यप, संजय भागवत, दिनेश निळकंठ, रामनाथ कलावडे,सुधाकर मोरे,मारोतराव सावंत, सुनील गोडसे,झोळ सर, निशिकांत पंचवाक, महादेव थोरात, ज्ञानेश्वर लष्करी आदींनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
