Team MyPuneCity – पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत सरकारने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. भारताने 1960 सालचा ऐतिहासिक असा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. या मोठ्या निर्णयासह भारताने इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेतला आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर 24 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये एक सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार विरोधकांना पहलगाम हल्ल्यानंरच्या भारताच्या भूमिकेची आणि पहलगाममधील सद्यस्थितीची माहिती देणार ( Pahalgam terrorist attack) आहेत.
भारत सरकारने घेतलेले निर्णय ( Pahalgam terrorist attack)
१. १९६० साली लागू झालेला सिंधू पाणी करार भारताने स्थगित केला आहे पाकिस्तानवर पाचा मोठा परिणाम होणार आहे
२. अटारी बॉर्डर बंद करण्यात आलेली आहे भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये असतील तर त्यानी मेपर्यंत माघारी यावं असं आवाहन करण्यात आले आहे.
३. पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा बंद करण्यात आलेला आहे.
४. एका आठवडयामध्ये भारतात असलेल्या पाकिस्तानी राजकीय अधिका-यांनी देश सोडावा असे आदेश देण्यात आलेले आहेत.
५. भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्यात आला आहे. अधिकान्यांना पाकिस्तानात माधारी जाण्याचे आदेश देण्यात आलेते आहेत.