मावळ ऑनलाईन – पुणे ग्रामीण पोलिसांनी एका धाडसी कारवाईत ( Betab Pawar)महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या तीन राज्यांच्या पोलिसांना हवा असलेला सराईत गुन्हेगार व आंतरराज्य टोळीचा म्होरक्या बेताब उर्फ शिवम उर्फ शुभम आनंद पवार (रा. हनुमान टेकडी, क्रांतीनगर, कुसगाव, ता. मावळ, जि. पुणे) याला कर्नाटकमधील कलबुर्गी येथून ताब्यात घेऊन लोणावळ्यात आणले आहे. अल्पवयीन मुली व महिलांचे अपहरण, कैदेत ठेवणे, मारहाण करणे, लैंगिक अत्याचार करणे आणि जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यांत तो मागील दोन वर्षांपासून फरार होता.
Maval Forest Division : मावळ तालुक्यातील वन विभागाच्या जागेत देवराई लावणार देशी वृक्ष
गुन्हेगारी कारवायांचा धडाका
सप्टेंबर २०२३ मध्ये लोणावळा परिसरातील कांतीनगर व हनुमान टेकडी भागात ( Betab Pawar)या टोळीची हालचाल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपी महिलांना व अल्पवयीन मुलींना पळवून आणून डांबून ठेवत असे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, मारहाण आणि काम करण्यास भाग पाडत असे, हे तपासात उघड झाले. त्यावेळी त्याचे दोन साथीदार राज सिद्धेश्वर शिंदे व ज्ञानेश्वर लोकरे यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र टोळीचा म्होरक्या बेताब पवार मात्र फरार होण्यात यशस्वी ठरला होता.
लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या( Betab Pawar) गुन्ह्यांमध्ये एका महिलेला चाकूचा धाक दाखवून पळवून नेणे, कैद करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणे, तिच्याकडील रोकड व मोबाईल हिसकावणे अशी गंभीर माहिती समोर आली होती. याच कारवाईदरम्यान पोलिसांनी एका महिलेची सुटका केली होती, त्यावेळी तिच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांनाही साखळदंडात बांधलेले आढळले होते.
Alandi : श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिन निमित्त माऊलीं मंदिरात पारायण व कीर्तन सोहळा
विविध राज्यांतील गंभीर गुन्हे( Betab Pawar)
पुणे ग्रामीण : ४ गंभीर गुन्हे
गुजरात : २ गुन्हे
कर्नाटक : १ गुन्हा
या सर्व गुन्ह्यांमध्ये अपहरण, लैंगिक अत्याचार, जबरी चोरी यासह पोक्सो कायदा आणि अल्पवयीन न्याय कायद्याखालील कलमांचा समावेश आहे. आरोपी पूर्वी साबरमती कारागृहातून तात्पुरत्या जामिनावर बाहेर आला होता. मात्र, पुन्हा हजर न राहता विविध राज्यांमध्ये पलायन करून गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्या.
पोलिसांनी माग काढत अखेर कर्नाटकमधील कलबुर्गी येथून बेताब पवारला जेरबंद ( Betab Pawar) केले. त्याला लोणावळ्यात आणून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे महिलांमध्ये व नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून आंतरराज्य गुन्हेगारी टोळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.