मावळ ऑनलाईन –सध्या अन्नावाचून अनेकजण उपाशी आहेत. (Tukaram Munde)त्यांच्याबाबत प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे. केवळ समस्या आणि त्याबाबत विचार मांडण्याची गरज नाही. देश प्रथम या संकल्पनेतून प्रत्येकाने काम करावे, असे प्रतिपादन राज्याच्या दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी केले. वडगाव मावळ येथे मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेचे सहावे पुष्पगुंफताना महाराष्ट्राचे शासन काल आज आणि उद्या या विषयावर मुंढे बोलत होते.
यावेळी मंत्री शिवेद्रराजे भोसले, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर,रविंद्र भेगडे,ज्ञानेश्वर दळवी, सुभाषराव जाधव,विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर व कार्याध्यक्ष डॉ रवींद्र आचार्य उपस्थित होते.
Talegaon: पांडवांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घोरावडेश्वर डोंगरावरील अमरदेवी मंदिर
Pune: कोंढव्यातील येवलेवाडीत नायजेरियन नागरिकाकडून मेफेड्रोन जप्त; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
तुकाराम मुंडे पुढे म्हणाले की लोकशाहीमध्ये शासन म्हणजे लोक हे केंद्रबिंदू आहेत तर लोकांच्या दृष्टिकोनातून शाश्वत विकास होणे हे गरजेच आहे त्यासाठी लोकांचा सहभाग आशीर्वाद महत्त्वाचा असतो.असे त्यांनी सांगितले
प्रास्ताविक मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी केले.सूत्रसंचालन कल्पेश भोंडवे यांनी केले.मानपत्र वाचन मकरंद बवरे यांनी केले तर आभार ॲड विजय जाधव यांनी मानले.



















