situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : कावळ्यांचा त्रास सहन न झाल्याने माकडाची चिडचिड; उद्यानातील बगळ्यांच्या पिल्लांचा घेतला जीव

Published On:
Talegaon Dabhade
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे येथील राव कॉलनीतील नगरपरिषद उद्यानात आज सकाळी एक अजब, दु:खद आणि नैसर्गिक संघर्षाचा प्रकार( Talegaon Dabhade) समोर आला. कावळ्यांनी त्रास दिल्यामुळे चिडलेल्या एका माकडाने झाडांवरील बगळ्यांच्या घरट्यांवर हल्ला चढवून अनेक निष्पाप पिल्लांचा जीव घेतला.

आज सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास नगरपरिषदेच्या राव कॉलनीतील उद्यानात एक माकड आले. या माकडाच्या आगमनाने उद्यानातील झाडांवर वसलेले कावळे अस्वस्थ झाले. त्यांनी जोरजोरात कावकाव करत त्याच्या मागे धाव घेतली आणि चोची मारत त्याला हटवण्याचा प्रयत्न केला.

Akurdi : आकुर्डी परिसरातील नागरिक विजेच्या लपंडावाला त्रस्त

या सातत्यपूर्ण त्रासामुळे माकड चिडले आणि त्याने रागाच्या भरात उद्यानातील झाडांवरील बगळ्यांच्या घरट्यांकडे मोर्चा वळवला. एकामागोमाग एक बगळ्याची घरटी उद्ध्वस्त करत त्याने घरट्यातील पिल्लांना उचलून खाली फेकले. उंचावरून ( Talegaon Dabhade) पडल्यामुळे अनेक पिल्लांचा जागीच मृत्यू झाला, तर काही पिल्ले गंभीर जखमी झाली.

वन्यजीव रक्षकांनी घेतली तत्काळ दखल

ही घटना लक्षात येताच ‘वन्यजीव रक्षक, मावळ’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माकडाला झाडावरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच झाडावरून खाली पडून जखमी झालेल्या बगळ्यांच्या पिल्लांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

गराडे यांनी सांगितले की, “प्राणी व पक्ष्यांमधील नैसर्गिक संघर्षाचे हे उदाहरण दुर्दैवी असले, तरी अशा घटना मानवी हस्तक्षेपामुळे वाढलेल्या असंतुलनाचेही द्योतक आहेत. यासाठी वनविभागाने लक्ष देऊन अशा उद्यानांमध्ये योग्य देखरेख करणे गरजेचे आहे.”

परिसरात हळहळ

या घटनेमुळे उद्यानात फिरायला येणारे नागरिक, महिला व लहान मुलेही अस्वस्थ झाले. अनेकांनी बगळ्यांच्या निष्पाप पिल्लांचे मृतदृश्य पाहून हळहळ व्यक्त केली.

उद्यानामध्ये पक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करणे, प्राणी व पक्ष्यांमधील संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करणे याची गरज आता अधिक तीव्रतेने ( Talegaon Dabhade) जाणवत आहे.

Follow Us On