situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sadanand More: महाराष्ट्रात संगीताइतके नृत्यकलेला महत्त्व दिले गेलेले नाही – डॉ. सदानंद मोरे

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –  नृत्यकलेला प्राचीन वारसा आहे, नृत्यात सर्व प्रकारचा अभिनय (Sadanand More)आहे, मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात संगीताइतके नृत्यकलेला महत्त्व दिले गेलेले नाही, अशी खंत ज्येष्ठ साहित्यीक डॉ. सदानंद मोरे यांनी आज येथे व्यक्त केली. ज्येष्ठ कथ्थक नर्तक, नंदकिशोर कल्चरल अकादमीचे संस्थापक पं. नंदकिशोर कपोते लिखित नाट्यशास्त्र व अभिनय दर्पणातील नृत्यतत्वे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर संगीताचार्य आणि भातखंडे संगीत विद्यापीठाचे माजी कुलगुरु पं. विद्याधर व्यास, माजी खासदार आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे विश्‍वस्त प्रदीप रावत, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन उपस्थित होते.

डॉ. मोरे पुढे म्हणाले की, संगीत कलेला जितके महत्व दिले गेले आहे, तितके नृत्य क्षेत्राला मिळालेले नाही. शास्त्रीय नृत्यापासून ते लावणीपर्यंतचा प्रवास संशोधनाचा विषय आहे आणि तो या पुस्तकातून वाचायला मिळतो, यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. खरे तर नृत्य शास्त्र हा व्यापक विषय आहे, त्यात विविधता आहे आणि या कलेतून विश्‍वाकडे पाहण्याची दृष्टी प्राप्त होते. आजच्या काळात नृत्यशास्त्रातील संशोधनाची गरज आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीमध्ये देखील नृत्यकलेचे दाखले दिलेले आहेत. भारतीय संस्कृतीत अगदी पुराणकाळापासून नृत्य, संगीत, अभिनय याची महती दिसून येते. या सर्व बाबींचा सर्वंकष आढावा डॉ. कपोते यांच्या या संशोधनापर पुस्तकात दिसतो.

यावेळी व्यास म्हणाले की, गायन, वादन, नृत्य या कलांना महाराष्ट्राने सन्मान दिला आणि मोठया प्रमाणावर शिष्य परंपरा दिली आहे. या कलांचे मानवी जीवनात अनन्य साधारण असे महत्त्व आहे. सर्व जगात भारतीय संगीत सर्वश्रेष्ठ आहे. उत्तर भारतात संगीत क्षेत्राची विविध घराणी आहेत. 19 व्या शतकानंतर ही घराणी महाराष्ट्रात आली, ती विकसित झाली आणि शिष्य परंपरा मोठया प्रमाणावर लाभली आहे. गायन, वादन, नृत्य यामध्ये नृत्य क्षेत्राचे तितकेच महत्त्वाचे स्थान आहे. या पुस्तकातून नृत्यकलेचा व्यापक प्रमाणावर अभ्यास केला जावा असेही ते म्हणाले.

सुरुवातीला अकादमीच्या विद्यार्थीनींनी गणेश वंदना आणि कानडा राजा पंढरीचा या अभंगाचे नृत्याच्या माध्यमातून प्रभावीपणे सादरीकरण केले. डॉ. कपोते यांनी पुस्तक लेखना मागाची भूमिका मांडली. या पुस्तकात 22 प्रकरणे असून त्यात या कलेची सविस्तर माहिती दिली आहे. सुरुवातीला विश्‍वस्त रावत यांनी प्रास्ताविकात नृत्यकला आणि संस्था यांच्यातील स्नेहाचे नाते उलगडले. तसेच कलेच्या क्षेत्रातील महाराष्ट्राचे व पुण्याचे नाते अधोरेखित केले. कार्याध्यक्ष पटवर्धन यांनी आभार मानले तर प्रतिभा चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Follow Us On

Also Read