Team MyPuneCity – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेत संस्थेच्या १६ तर वाणिज्य विभागात ११ शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. कला शाखेतील सहा आणि व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील चार शाळांतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे राज्याचे उपमुख्यमंत्री, संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
विज्ञान विभागात संस्थेच्या २२ शाळांमधून ३११४ विद्यार्थी परीक्षेला बसले (Pune News) होते. त्यापैकी ३०८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांचे शेकडा प्रमाण ९९.०७ टक्के आहे. संस्थेतील ओतूर, पिरंगुट, न्हावरे, पौडरोड, सूपे, लोहगाव, शिवणे, निमगाव केतकी, संविदणे, नसरापूर, वाघोली, कळस,चऱ्होली, वेल्हे, खानापूर, शेलपिंपळगाव या सोळा शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. तर उर्वरीत सासवड, सांगवी, हडपसर, आकुर्डी, कामशेत वाणिज्य विभागात २५ शाळांमधील २४६४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांचे शेकडा प्रमाण ९४.३६ टक्के आहे.
संस्थेतील कामशेत, शिवणे, सूपे, आकुर्डी (इंग्रजी माध्यम), लोहगाव, मुंढवा, न्हावरे, चऱ्होली, वेल्हा, मोशी, इनामगाव या अकराशाळांचे निकाल शंभर टक्के लागले (Pune News) आहेत. तर उर्वरीत पिरंगुट, ओतूर, नसरापूर, खानापूर, वाघोली, पौड, हडपसर, पौडरोड, शेलपिंपळगाव, आकुर्डी,नानगाव, सासवड या शाळांचे निकाल ९० टक्केच्या पुढे आहेत.कला विभागात २५ शाळांमधील १३९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांचे शेकडा प्रमाण ८७.३३ टक्के आहे. संस्थेतील शिवणे, कळस, लोहगाव, पौड या चार शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. तर उर्वरीत न्हावरे, पिरंगुट, सुपे,चऱ्होली, निमगाव केतकी, मोशी, वेल्हे या शाळांचे निकाल ९२ टक्केच्या पुढे आहेत.
व्यवसाय अभ्यासक्रम विभागात विविध कोर्सेससाठी (Pune News) २३ शाळांमधील ९८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांचे शेकडा प्रमाण ९२.९२ टक्के आहे. संस्थेतील पिरंगुट, सूपे, निमगाव केतकी, पौड, शिवणे, मुंढवा या सहा शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. तर उर्वरीत चऱ्होली, हडपसर, मोशी, पौडरोड, लोहगाव, सांगवी, वाघोली, कामशेत, खानापूर, वाणेवाडी, सासवड, देहूरोड या शाळांचे निकाल ९० टक्केच्या पुढे आहेत.
याबाबत संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड.संदीप कदम यांनी सांगितले की शाळांतील शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील असतात. संस्थेच्या माध्यमातूनही तज्ञांचे मार्गदर्शन, विविध परीक्षांची तयारी या माध्यमातून निकालवाढीसाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे दरवर्षी राज्याचा, पुणे विभाग आणि पुणे जिल्ह्याच्या तुलनेत संस्थेचा निकाल जास्त असतो. यावर्षीही ती परंपरा कायम राखली गेली आहे. यावेळी
संस्थेचे खजिनदार अॅड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव आदि उपस्थित (Pune News) होते.