मावळ ऑनलाईन – दि ५ ऑगस्ट २०२५ रोजी माय रमाई फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने माता सावित्रीबाई फुले स्मारक हॉल पिंपरी येथे सर्व जाती धर्मातील वधू-वर मेळावा ( My Ramai Foundation ) आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले.
Dehuroad News : ट्रक चढला थेट दुभाजकावर, सुदैवाने जीवित हानी नाही
कार्यक्रमाचे उद्घाटन भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले. यावेळेस संस्थापक अध्यक्ष डॉ. अमर चौरे, उपाध्यक्ष मंगल चौरे, गायक साजन बेंद्रे, गायक राहुल शिंदे, आर.पी.आय. नेते सूर्यकांत वाघमारे, अजिज शेख, चिमूरकर साहेब, कुणाल वाव्हाळकर, सुंदर कांबळे, राजन नायर, डॉ. इशिका सूर्यवंशी, ईशा धोंगडे,वैशाली लगाडे, अश्विनी कसबे, अंजली सरोदे, रंजन चोपडे, छाया साळुंखे, भिकमबाई उबाळे, यांच्यासह अनेक मान्यवर ( My Ramai Foundation ) उपस्थित होते.
Ganja smuggling : कारागृहातून सुटताच करत होता गांजाची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
“समाजभूषण पुरस्कार २०२५” भरत नाना राजीवडे यांना तर “रमाई रमाईचे लेख पुरस्कार” २०२५ ज्योती भरत राजीवडे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वधू वर परिचयासह इतरही क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रातून माय रमाई फाउंडेशन ट्रस्टचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वधू वर व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात ( My Ramai Foundation ) आली.