situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval Wild Life : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी मावळात ३६ पाणवठ्यांची सुविधा

Updated On:
Maval Wild Life
---Advertisement---

Team MyPuneCity – उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाण्याची टंचाई जाणवू लागलेली असताना, वन्य प्राण्यांसाठी एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. शिरोता वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या उकसान वनपरिमंडळातील राकसवाडी येथील पाणवठ्यावर वन्यप्राण्यांसाठी (Maval Wild Life) पाणी सोडण्यात आले. या उपक्रमात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले, वनपरिमंडळ अधिकारी एम. बी. घुगे, जी. ए. भोसले, डी. डी. उबाळे, एस. बी. साबळे तसेच वनमजूर घुले यांची प्रमुख उपस्थिती होती. पाणवठ्यावर पाणी सोडण्याची ही प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली.

Khandala Ghat Accident : खंडाळा घाटात ट्रकची पाच वाहनांना धडक; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, १२ जण जखमी

उन्हाळ्यात वन्य प्राण्यांना (Maval Wild Life) पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे अशा पाणवठ्यांची निर्मिती आणि त्यातील नियमित पाणीपुरवठा अत्यंत आवश्यक असतो. मावळ तालुक्यातील नाणे मावळ भागात आतापर्यंत ९ पाणवठे तयार करण्यात आले आहेत, तर अंदर मावळ परिसरात २७ पाणवठ्यांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण ३६ पाणवठ्यांमधून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार आहे.

या उपक्रमाचे मावळ तालुक्यातून कौतुक होत आहे. ‘वन्यजीव रक्षक मावळ’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश गराडे यांनी वनविभागाच्या या प्रयत्नाचे स्वागत करताना सांगितले की, “वन्यप्राण्यांचे संवर्धन व त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची अत्यंत गरज आहे. हे कार्य स्थानिक नागरिकांसाठीही प्रेरणादायी आहे.”

Devendra Fadnavis: सेवाकार्यात स्वयंसेवी संस्थांची भूमिका महत्वाची – देवेंद्र फडणवीस

वनविभागाच्या या उपक्रमामुळे जंगल परिसरात राहणाऱ्या वन्यजीवांना (Maval Wild Life) उन्हाळ्यात दिलासा मिळणार असून, मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासही मदत होणार आहे. आगामी काळात अशा आणखी पाणवठ्यांची वाढ करण्यात येईल, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Follow Us On

Also Read