मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी (15 जून) दुपारी कोसळला. यामध्ये सुमारे 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे पादचारी पूल भरण्यात आला आहे. त्यावरून दुचाकी वाहनांची देखील वाहतूक होते. रविवारी कुंडमळा येथे पर्यटकांची गर्दी होती. दुपारी अचानक पूल कोसळला. यामध्ये पुलावरील सुमारे 25 जण नदीमध्ये वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीस, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि इतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, सहा जण जखमी झाले आहेत. एक महिला वाहून गेली होती. तिलाही बाहेर काढण्यात आले आहे.
6 जणांचा मृत्यू- आमदार सुनिल शेळके
ही दुर्घटना समोर येताच आमदार सुनिल शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत. जमेल त्या पद्धतीने मदतकार्य केले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचल्या आहेत. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे, अशी माहिती सुनिल शेळके यांनी दिले आहे. तळगाव नगरपरिषदेची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे, अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली आहे.