मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील साकव पूल रविवारी (15 जून) दुपारी कोसळला. यामध्ये सुमारे 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
इंद्रायणी नदीच्या पात्रातील रांजणखळग्यांमुळे कुंडमळा हे ठिकाण पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे बनले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे आज पर्यटकांची त्या ठिकाणी मोठी झुंबड उडाली होती.
इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे पादचारी पूल (साकव पूल) उभारण्यात आला होता. त्यावरून दुचाकी वाहनांची देखील वाहतूक होते. रविवारी कुंडमळा येथे पर्यटकांची गर्दी होती. दुपारी अचानक पूल कोसळला. यामध्ये पुलावरील सुमारे 25 जण नदीमध्ये वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि इतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचाव कार्य वेगाने सुरू आहे.
Marathi Natya Parishad : जीवनगौरव सन्मान सुरेश साखवळकर व नीना कुळकर्णी यांना प्रदान


मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी (15 जून) दुपारी कोसळला. यामध्ये सुमारे 25 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

इंद्रायणी नदीवर कुंडमळा येथे पादचारी पूल भरण्यात आला आहे. त्यावरून दुचाकी वाहनांची देखील वाहतूक होते. रविवारी कुंडमळा येथे पर्यटकांची गर्दी होती. दुपारी अचानक पूल कोसळला. यामध्ये पुलावरील सुमारे 25 जण नदीमध्ये वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि इतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचाव कार्य वेगाने सुरू आहे.