Team MyPuneCity – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर करण्यात आलेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा महाराष्ट्र ब्राह्मण सभेने (Maharashtra Brahman Sabha) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्यात धर्म विचारून हिंदू असल्याची खात्री करून घेतल्यानंतर निर्दोष नागरिकांवर गोळ्या झाडण्यात आल्या, ही घटना नुसती अतिरेकी कारवाई नसून, ती राष्ट्राच्या स्वाभिमानावर आणि हिंदू धर्माच्या अभिमानावर झालेली गंभीर घाला असल्याचे सभेने म्हटले आहे.
या हल्ल्यात दत्ताजी शिंदे यांच्यासारख्या देशभक्ताने “क्यू नही? बचेंगे तो और भी लढेंगे!” असे अभिमानाने उत्तर दिल्याची आठवण सभेने नमूद केली. मात्र, आज हिंदू समाजाला जात, प्रांत, भाषा यासारख्या मुद्द्यांवर विभागले जात असल्यामुळे खऱ्या शत्रूविरुद्ध लढताना आपल्यातच मतभेद निर्माण होत असल्याचा खेदही सभेने (Maharashtra Brahman Sabha) तीव्र शब्दांत निषेध केला आहे. व्यक्त केला.
“क्यू हिंदुओ और भी कटोगे?” असा कुत्सित सवाल अतिरेक्यांकडून विचारला जात असताना, “क्यू नही? बटेंगे तो और भी करेंगे…” असे निराश उत्तर आजच्या हिंदू समाजाकडून मिळत आहे, याचे दु:ख व्यक्त करत, हिंदू धर्माची एकात्मता आज धोक्यात असल्याचे भाष्य या निवेदनात करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ब्राह्मण सभा या घटनेचा केवळ निषेध करत नाही, तर अशा प्रत्येक राष्ट्रविरोधी आणि हिंदूविरोधी कृत्यांप्रती कटिबद्धपणे आवाज उठवत राहील, असा निर्धारही सभेने व्यक्त केला आहे. हल्ल्यात मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
Lonavala Morcha : लोणावळा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा; अमली पदार्थ विक्रीविरोधात नागरिक आक्रमक
या निवेदनावर महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे (Maharashtra Brahman Sabha) राष्ट्रीय अध्यक्ष अतुल व्यास, प्रदेशाध्यक्ष डॉ. सचिन बोधनी, तसेच महाराष्ट्र प्रदेश संघटनप्रमुख अनिकेत र. वालावलकर यांच्या सह्या आहेत.