मावळ ऑनलाईन – मावळ भूषण, शिक्षण महर्षी, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी त्यांच्या राजकीय जीवन प्रवासात विधायक आणि सकारात्मक कामांना प्राधान्य दिले आणि समाजोपयोगी कामे अखेरपर्यंत केली असे प्रतिपादन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी ( Krishnarao Bhegde) तळेगाव येथे आयोजित शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करताना केले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहात भेगडे परिवार व समस्त मावळ वासियांकडून शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध राजकीय, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था,यांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या ( Krishnarao Bhegde) संख्येने उपस्थित होते.
या सभेत खासदार बारणे बोलताना पुढे म्हणाले की , ५२ वर्षाच्या राजकीय प्रवासात सार्वजनिक कामे करताना अतिशय पारदर्शकपणे काम करून समाजाला विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले. तर गोरगरीबांकरिता कायमस्वरूपी विविध शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
Pavana Dam : पवना धरणातून 400 क्युसेक्स विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले की, बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले आमचे साहेब आपल्यात आज नाही . विद्यापीठ खऱ्या अर्थाने लोप पावले आहे. त्या विद्यापीठाचे विचार पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरण्यासाठी साहेबांचा पूर्णाकृती पुतळा नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणामध्ये उभारण्यात येणार आहे . ज्यायोगे विद्यार्थ्यांना कायम स्वरुपी प्रेरणा मिळत राहील. भेगडे साहेब माझ्यासाठी नव्हे तर बहुजन समाजासाठी सर्व काही होते, ( Krishnarao Bhegde) असेही काकडे यांनी यावेळी सांगितले.
गिरीश देसाई म्हणाले की शिक्षणाला वाहून घेणारे पदाधिकारी होते, असा पदाधिकारी आता होणे नाही.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ सचिव संतोष दत्तात्रय खांडगे म्हणाले की, भेगडे साहेब हे आमच्या परिवाराचे सर्वस्व आधारवड होते.या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वामुळे माझ्यासारख्याला एवढ्या मोठ्या ऐतिहासिक शैक्षणिक संस्थेत काम करण्याची संधी मिळाली आणि तीही साहेबांच्या बरोबर हे माझं सदभाग्य आहे. आमचा वटवृक्ष उन्मळला अशा ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचे स्मरण नित्य राहील..
मावळचा स्वयंप्रकाशित तारा हरपला,असे भास्करराव म्हाळसकर यांनी सांगत अखेरपर्यंत भेगडे साहेबांनी एकजूट ठेवली. व्यक्ती जाते मात्र, विचार तसेच ( Krishnarao Bhegde) राहतात.

तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले की, सर्वस्पर्शी, अष्टपैलू नेता हरपला. त्यांचा शब्द अंतिम असायचा; मात्र अंतिम शब्दच हरपल्याचे खांडगे यांनी सांगितले. भेगडे साहेब म्हणजे आमच्या परिवाराचे दैवतच होते.
साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर म्हणाले की, भेगडे साहेबांचे राजकारण उत्तम दर्जाचे व्यापक आणि वैचारिक भूमिकांना प्रोत्साहित करणारे होते. ज्यांना राजकारणात उत्तम व्हायचे असेल त्यांनी भेगडे यांचे मार्गदर्शन घ्यावे अशा दर्जाचे राजकारण त्यांनी केले.
डॉ डी एम. डोमकुंडवार म्हणाले की, सहृदयी व्यक्तिमत्व गेल्याचे दुःख वाटते! शिक्षणावर गाढ श्रद्धा असणारा नेता हरपला. पिंपरी चिंचवड कॉलेजला मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी( Krishnarao Bhegde) सांगितले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा आधारवड गेल्यांने इंद्रायणी संस्था व परिवार पोरका झाला असल्याचे इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले.
तसेच रमेश जांभुळकर, आयुब शिकीलकर,माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, श्री संत तुकाराम कारखान्याचे संचालक ज्ञानेश नवले, डॉ दीपक शहा, डॉ अनंत परांजपे, प्रकाश ओसवाल, लक्ष्मण भालेराव, सुनील भोंगाडे, रवीना व रिद्धी म्हस्के, यादवेंद्र खळदे, श्रीकृष्ण मुळे आदींनी आपल्या मनोगताद्वारे श्रद्धांजली वाहिली. सूत्रसंचालन डॉ विनया केसकर यांनी केले तर ऋणनिर्देश रवींद्र आप्पा भेगडे ( Krishnarao Bhegde) यांनी केले.