Team MyPuneCity – सरकार आपले काम करत राहील;(Hasib Drabu) पण आपण सामाजिक, धार्मिक सलोखा राखणे आवश्यक आहे. पर्यटन, अर्थव्यवस्था आणि व्यापारा इतकेच नागरी समाजातील प्रतिबद्धता, सामाजिक संबंध महत्त्वाचे असल्याचे मत जम्मू आणि काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांनी व्यक्त केले.
सरहद, पुणेतर्फे तिसऱ्या काश्मीर सम्राट ललितादित्य स्मृती व्याख्यानाचे शनिवारी (दि. ३) रॉयल कॅनॉट बोटक्लब, बंडगार्डन येथे आयोजन करण्यात आले होते. काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील शांतता, प्रगती आणि सुरक्षिततेवर परिणाम या विषयीवर हसीब द्राबू बोलत होते. अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस होते. प्रमुख पाहुणे म्हणून विजय फाऊंडेशन पुण्याचे संत सिंग मोखा यांची उपस्थिती होती. सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार, समन्वयक शैलेश पगारिया, अनुज नहार, संतोष बालवडकर, जाहिद भट, मनिषा वाडेकर, वैभव वाघ, लेशपाल जवळगे, सुयोग गुंदेचा उपस्थित होते.
Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘मेडीसिटी’ प्रकल्पाच्या हालचाली!
संजय नहार यांनी प्रास्ताविकात ललितादित्य मुक्तापिड यांची थोडक्यात माहिती दिली. वादाचे रुपांतर द्वेषात होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. अनुज नहार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीन द्राबू यांनी संजय नहार यांच्या काश्मीरमधील कार्याची स्तुती केली. काश्मीरविषयी बोलताना ते म्हणाले, फक्त पर्यटन हे काश्मिरी अर्थव्यवस्थेचा कणा नसून धार्मिक सलोखा आणि इतर घटक तितकेच महत्त्वाचे आहेत. विश्वास, एकता आणि सांस्कृतिक समज हीच शांतता आणू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. काश्मिरी जे बनवतात त्याचा ते उपभोग घेत नाहीत आणि उपयोगात आणतात ते आयात करतात.जम्मू-काश्मीरची लोकसंख्या देशाच्या एक टक्का आहे आणि अर्थव्यवस्थाही एक टक्का आहे. काश्मीर 1.3 लाख कोटीचे आयात इतर राज्याकडून करतो.
Suhas Garud : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुहास गरुड
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस म्हणाले, पहलगाम हे ठिकाण दहशतवाद्यांनी निवडले कारण काश्मीर हा भारताचा स्विझरलँड आहे. काही वर्षात तिथे झालेला विकास, पायाभूत सुविधा पाहून पर्यटनाला बाधा पोहोचावी आणि भीतीचे वातावरण निर्माण करणे हा त्यांचा उद्देश होता. सामाजिक शांतता भंग करून सामान्यांच्या जीवनात बाधा पोहचविणे तसेच समाजात असंतोष पसरवून सामाजिक, धार्मिक सलोखा बिघडविणे हा होता. या विरुद्ध कठोर पावले उचलण्यासाठी आणि सरकारवर दबाव टाकण्यासाठी माध्यमांचा पुढाकार आवश्यक असल्याचे, मत त्यांनी व्यक्त केले. शैलेश वाडेकर यांनी आभार व्यक्त केले.