situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Dehu : देहूफाटा-येलवाडी रस्त्याची दुरुस्ती पालखीपूर्वी न झाल्यास बेमुदत उपोषण

Published On:
Dehu
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – देहूफाटा ते येलवाडी तीर्थक्षेत्र मुख्य ( Dehu ) रस्त्याच्या दुरवस्थेला कंटाळून ग्रामस्थ, वारकरी, शेतकरी आणि कृती समितीच्या वतीने येलवाडी कमानीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पालखी सोहळ्यापूर्वी रस्त्याचे काम न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, मोठमोठे खड्डे, पावसामुळे साचणारे पाणी, अपघाताचे वाढते प्रमाण आणि अवजड वाहतुकीमुळे नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि वाहनचालक यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. तळेगाव-चाकण एमआयडीसी भागातील अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून देखभाल पूर्णपणे ( Dehu ) दुर्लक्षित आहे, अशी तीव्र भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Akurdi : आकुर्डी परिसरातील नागरिक विजेच्या लपंडावाला त्रस्त

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या :

  • मंजूर ८१ कोटींच्या निधीतून सिमेंट काँक्रिट रस्ता तातडीने तयार करावा.
  • देहूगाव ते येलवाडी दरम्यानचा पूर्ण रस्ता दुरुस्त करावा.
  • दोन्ही बाजूंनी डांबरी साईटपॅचचे काम त्वरित करावे.
  • पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होईल, अशी व्यवस्था करावी.
  • अतिक्रमण हटवून रुंदीकरण करावे.
  • उखडलेले गतिरोधक दुरुस्त करावेत.
  • शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात व संपादित जमिनीचा मोबदला द्यावा.
  • स्ट्रीट लाईट कार्यान्वित करावेत.
  • अवजड वाहतुकीवर नियंत्रणासाठी उपाय करावेत.
  • जप्त जमीन परत द्यावी.

यावेळी सरपंच नितीन गाई पाटील यांनी सांगितले की, “रस्ता मंजूर असूनही PMRDA व प्रशासनाने जाणूनबुजून काम थांबवले आहे. पालखीपूर्वी काम सुरू न झाल्यास आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत.”

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उत्तर

रास्ता रोको आंदोलन दरम्यान महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिस बंदोबस्तात हे आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अश्विनी पाटील यांनी स्पष्ट केले की, “पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणावर काम करणे शक्य नाही. मात्र लवकरच मजबूत व टिकाऊ रस्त्याचे काम हाती घेतले जाईल.”

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आपले निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र बव्हाण यांच्याकडे सादर केले आहे.

देहू यात्रेच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी आता तीव्र झाली असून, प्रशासनाच्या प्रतिसादावर येत्या काळात आंदोलकांची भूमिका ठरणार ( Dehu ) आहे.

Follow Us On