Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने पारायण व अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने आज तिसऱ्या दिवशी आळंदी मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आगमन झाले.प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. तदनंतर त्यांनी सोहळ्यात सहभागी होऊन हरिनामाच्या कीर्तनात वारकऱ्यां सोबत दंग झाले.यावेळी त्यांचा देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ,पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, विश्वस्त राजेंद्र उमाप ,विश्वस्त चैतन्य महाराज कबीर व विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या हस्ते माऊलींचे मूर्ती,प्रतिमा,शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या सोहळ्या प्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले विकसित भारताचा संकल्प कोठून सुरवात होतो तर तो आळंदीतून सुरू होतो.रस्ते वीज पाणी जगातील सर्वात उत्कृष्ट इम्पीरियल स्ट्रक्चचर तयार होईल. विश्वातल्या ज्या गोष्टी इतर जगात नाही त्या गोष्टी भारतात तयार होतील.२०४७ मध्ये जगातील सर्वोत्तम भारत निर्माण होईल .त्या करता लागणारे मानव संसाधन संस्कारमय व उत्कृष्ट लागेल.ते आय आय टी चे लागेल, ट्रिपल आयटीचे लागेल प्रचंड शक्तिमान विद्यावन मानव संसाधन जगाला लागणार आहे.भारताला लागणार आहे.
Court Verdict: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला नऊ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा
Pune People’s Bank : पुणे पीपल्स बँकेच्या तळेगाव शाखेचा मंगळवारी रौप्य महोत्सव सोहळा
जगातील जवळपास १५० वर देश भारत मानव संसाधनाच्या विश्वासावर आहेत.या विश्वासावरच उद्याचा २०४७चा भारत जग चालवेल.
भारता मध्ये जे मनुष्य संसाधन लागणार आहे ते मनुष्य संसाधन घडविण्याची क्षमता कोणाकडे आहे ती आळंदी देवस्थांकडे आहे.येथे संस्कार निर्माण होतील, येथे वारकरी संप्रदायाच्या संस्काराची नवी पिढी तयार होईल.विकसित भारताला लागणारे उत्कृष्ठ मानव संसाधन ,संस्कारित मानव संसाधन घडवण्याचा प्लॅन विश्वस्तांनी तयार केला. त्या त्यांचे नाव आहे ज्ञानपीठ.ज्ञानाची नगरी आळंदी आहे.संपूर्ण जगामध्ये देशामध्ये ज्ञानाची नगरी आळंदी आहे.
माऊली ज्ञानेश्वरांची नगरी आहे.या ज्ञानपिठाला सर्व पक्ष सर्व समाज ,धर्म एकत्र येऊन देव देश धर्माच्या कार्याला सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे.
तसेच यावेळी या सोहळ्यात जवळपास ५० हजार भाविक अन्न महाप्रसादाचा लाभ घेतात म्हणून ग्रामस्थ व जगताप यांच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.