situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bhat Sheti : सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे गणित बिघडले; मावळातील भात रोपवाटिका व पेरण्या अडचणीत

Published On:
Bhat Sheti
---Advertisement---

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यात यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसाठी (Bhat Sheti) दिलासा घेऊन येण्याऐवजी संकटांची मालिका घेऊन आला आहे. मे अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीस आवश्यक ‘वापसा’ मिळालाच नाही आणि त्यानंतर सुरू झालेल्या संततधार पावसामुळे भात रोपवाटिकांपासून ते खरीप हंगामातील इतर पिकांच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. परिणामी, शेतकरी वर्ग संभ्रमात आणि संकटात सापडला आहे.

सामान्यतः मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भात रोपवाटिका (Bhat Sheti) तयार करण्याचे काम वेग घेतं. मात्र यंदा या काळातच जोरदार पावसाने अनेक खाचरे पाण्याने भरून टाकली. परिणामी, जमीन भुसभुशीत होण्याऐवजी चिखलमय व दलदलीसारखी झाली आहे. ‘वापसा’ येण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा सततच्या पावसाने पुन्हा धुळीस मिळाल्या.

Kundmala Mishap Update : कुडंमळा दुर्घटनेनंतरच्या शोधकार्याची सांगता, ३५ जखमींना डिस्चार्ज, ११ जखमी अजूनही ‘आयसीयू’त

भाताच्या रोपांसाठी जमीन ओली लागते पण ती दलदलीची नसावी लागते, असं स्पष्ट करताना सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी सध्याच्या हवामानामुळे रोपवाटिका तयार करणे अशक्यप्राय झाल्याचे नमूद केले. कृषी अधिकारी विकास गोसावी यांनीही यावर चिंता व्यक्त करत सांगितले की, जमिनीत आवश्यक ती आर्द्रता टिकण्याऐवजी पाण्याचा साठा दलदल निर्माण करतो आहे. त्यामुळे रोपे तयार करण्याची वेळ उलटून गेली आहे.

याचा थेट परिणाम मुख्य भातलागवडीच्या (Bhat Sheti) वेळापत्रकावर होणार आहे. रोपवाटिका वेळेवर न झाल्याने लावणी प्रक्रिया लांबणीवर गेली आहे. या विलंबामुळे भाताचे पीक चक्र कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, पाणथळ जमिनीत किडी व रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीतीही शेतकऱ्यांमध्ये आहे. करपा, पानांवरील डाग, बुरशीजन्य रोग आणि कीटकजन्य हल्ले वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Pune: मानवी मेंदू तंत्रज्ञानापेक्षा कायम वरिष्ठच – शि. द. फडणीस

मावळ तालुक्यात अंदाजे १३,००० हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली (Bhat Sheti) आहे. त्याशिवाय सोयाबीनसाठी ४०० हेक्टर, भुईमुगासाठी ३५० हेक्टर आणि इतर कडधान्यांसाठी ३०० हेक्टर क्षेत्रात पेरण्या होतात. मात्र पावसाच्या विस्कळीततेमुळे या सर्वच पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत.

पावसाने रोपे घ्यायची वेळ गाठली, पण जमिनी लागवडीसाठी तयार नाहीत. आता रोपे तयार झाली, तरी त्याची लागवड कधी करायची, याचा ठावठिकाणा नाही, असा प्रश्न सध्या मावळातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडावर आहे.

सरकार व कृषी विभागाने तातडीने यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा यंदाचा खरीप हंगाम अडचणीत सापडण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

Follow Us On