मराठी काय हे अनुभवायाचे असेल शिकावयाचे असेल ज्ञानेश्वरी शिवाय पर्याय नाही
Team MyPuneCity –संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने पारायण व अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने आळंदी मध्ये उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचे आगमन झाले.
प्रथम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. तदनंतर त्यांनी सोहळ्यात सहभागी होऊन हरिनामाच्या कीर्तनात वारकऱ्यां सोबत दंग झाले.यावेळी त्यांचा देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ,पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, विश्वस्त राजेंद्र उमाप ,विश्वस्त चैतन्य महाराज कबीर व विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या हस्ते माऊलींचे मूर्ती,प्रतिमा,शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमा सोहळ्या वेळी उदय सामंत म्हणाले मराठी काय हे अनुभवायाचे असेल शिकावयाचे असेल ज्ञानेश्वरी शिवाय पर्याय नाही.हे सर्वांना मान्य आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
Sunil Shelke: आपल्याकडून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या अडचणी समजल्या पाहिजेत- सुनील शेळके

त्याबद्दल त्यांचे कौतुक करतो व अभिनंदन करतो.अभिजात भाषेला दर्जा भेटण्यासाठी पहिला जो प्रस्ताव पाठवला असेल तो राज्यमंत्री म्हणून २०१३ ला पाठवला.माऊलींच्या आशीर्वादाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला जीआर दिल्ली वरून आणण्याचे भाग्य मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री झाल्यावर मला मिळाले.
माझी मराठी भाषा ही ज्ञानेश्वर माऊलीं पासून सुरू झाली आहे. ७५१ वर्ष जन्मोत्सवाचे सुरू होत आहे.या निमित्ताने त्यांनी ज्ञानेश्वरीच्या छपाई साठी १ कोटीं त्यांनी जाहीर केले.
७५१ व्या जन्मोत्सवा वर्ष निमित्ताने प्रत्येक जिल्हा मध्ये ज्ञानेश्वरांच्या नावाने कीर्तन महोत्सव करायचा असेल तर त्याची जबाबदारी मराठी भाषा मंत्री म्हणून स्वीकारतो अशी त्यांनी ग्वाही दिली.सर्व सामान्य माणूस आमच्या कडे पाहून येत नाही.तो माऊलींकडे पाहून येतो,विठुरायकडे पाहून येतो.
याव्यतिरिक्त, पवित्र इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून इंद्रायणी नदीला प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
देवस्थान चा महत्वकांक्षी ज्ञानभूमी प्रकल्पासाठी देवस्थानच्या वतीने शासनाकडे निधी साठी आग्रह आणि पाठपुरावा करणार असल्याचे ते बोलले.या पवित्र सोहळ्यात सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांनी आभार मानले.
तसेच यावेळी पंढरपूर वारी सोहळा, ज्ञानमुमी,वारकरी संस्था, रिंगण सोहळा याबाबत विश्वस्त निरंजन नाथ यांनी माहिती दिली.यावेळी विलास लांडे,राम गावडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,डी डी भोसले पा.,शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.