Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव सप्तशतकोत्तर महोत्सवानिमित्त ( Alandi) अखंड हरिनाम व पारायण सोहळा आळंदीमध्ये सुरू आहे. आज या पारायणाचा चौथा दिवस सुरू आहे. सकाळी ६ ते १० या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आळंदीतील सोहळयात हजारो भाविक ज्ञानेश्वरी पारायण करत आहेत.आज ज्ञानेश्वरीमधील तेराव्या अध्यातील ओवी ३६९ ते ४६१ या ओवी पर्यंत गुरुभक्ती विषयी माऊलींने सांगितले आहे.या माऊलींच्या त्या ओव्यांचे पारायण करत असताना पारायणाचार्य एकनाथ महाराज कोष्टी गहिवरले व डोळ्यातून अश्रू अनावर होत काही वेळ स्तब्ध झाले. हा गुरू भक्तीविषयी भावनिक क्षण असला तरी पारायण वाचनात खंड पडू नये यासाठी भाविकांनी पारायणातील पुढील ओव्यांचे पठण सुरू ठेवले.
तत्पूर्वी सकाळी सहा ते साडे आठ पारायण झाले होते व भाविकांसाठी थोडासा अल्पोहाराचा वेळ देण्यात आला होता. त्यानंतर एकनाथ महाराज कोष्टी यांनी तेराव्या अध्यायातील ३६९ ते ४६१ या ओव्यांविषयी माहिती देत असताना सांगितले, ज्ञानेश्वरीमध्ये ९० ओळ्या अगदी महत्वाच्या असून त्या बरोबर माऊलींनी ग्रंथाच्यामधोमध आणल्या आहेत.आपण आता जवळ जवळ साडेचार हजार ओव्या वाचल्या आहेत.अजून आपणाला साडेचार हजार वाचावयाच्या आहेत .मध्यभागी आणल्या म्हणजे हा ज्ञानेश्वरी ग्रंथाचा गाभा आहे आणि आपल्या जीवनाचा गाभा ( Alandi) आहे.
या ओव्यांमध्ये माऊलींनी आचार्य उपासनम या पदाचे व्याख्यान केले आहे.आचार्य उपासन म्हणजे गुरुभक्ती. गुरुभक्ती कशी करायची? माऊलींनी सद्गुरू निवृत्ती नाथांची गुरू सेवा कशी केली? माऊलींचा गुरूनविषयी काय भाव होता ? कशी श्रद्धा होती? किती आदर होता ? या नव्वद ओव्यांमध्ये माऊलींनी सांगितले आहे.या नव्वद ओव्यांचा अर्थ वाचावेत. विठ्ठल नामाची शाळा भरली आहे.पारायण करणाऱ्या भाविकांसाठी हा गृहपाठ आहे.अर्था सहित ज्ञानेश्वरी मध्ये त्या ओव्या वाचाव्यात.त्या नव्वद ओव्यां पैकी एका जरी ओवी प्रमाणे जीवन बनले तर आपले जीवन सफल झालो समजायचे.
या नव्वद ओव्यांमध्ये माऊलींनी गुरुभक्ती कशी करावी सांगितली आहे. माऊलींचा भाव,आदर, श्रद्धा गुरूवर किती होता? हे या नव्वद ओव्यांमध्ये समजणार आहे.माऊली म्हणतात गुरू तिकडे राहतात, त्या बाजूने जरी वारा आला त्या वाऱ्याला म्हणतात तू माझ्या घरी चल .गुरुभक्ती या देहात मी करीनच,पण हा देह पडल्या नंतर पुढचा जन्म गुरुभक्ती करण्यासाठी घेईल.गुरू विषयी खूप सुंदर वर्णन यात केले आहे.त्यांनी ही माहिती दिल्यानंतर त्यांनी तेराव्या अध्यायातील त्या ओव्यांचे पठण ( Alandi) केले.