शालान्त परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ..
मावळ ऑनलाईन –भारत देशाच्या जडणघडणीमध्ये व(Vadgaon Maval) प्रगतीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असल्याचे असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ श्रीराम विद्यालय, नवलाख उंबरे येथे उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी शेटे बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती शेटे,शाळा समिती अध्यक्ष सुरेश शेटे, तसेच अनिल नरवडे,संतोष नरवडे,सोपान नरवडे, राजेंद्र कडलक,महेश शेटे, अरुण शेटे,सागर शेटे, शत्रुघ्न शेटे,दत्ता शेटे, प्रकाश शेटे,पांडुरंग कोयते,जालिंदर शेटे,प्रभाकर पडवळ,नारायण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थ आणि पालकवर्ग यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
शेटे पुढे बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी सामाजिक,सांस्कृतिक मूल्य प्रस्थापित करणारे आहेत.संघनिष्ठ भावनेने विद्यार्थी आपल्या जीवनाला आकार देऊ शकतात. ग्रामीण विद्यार्थीच यशाचे भवितव्य आहे.असे गौरवोद्गार शेटे यांनी काढले.
या समारंभात यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्रे व स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या क्षेत्रात जिद्द,चिकाटी,मेहनतीने पुढे जावे असे आवाहन इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी केले.
New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
Pune: “कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक २०२५ ” व पुणे लिग कबड्डी स्पर्धा
संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनीही प्रेरणादायी शब्दांत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक विनय गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. युवराज सोनकांबळे यांनी सुत्रसंचालन केले तर संस्थेचे सदस्य युवराज काकडे यांनी आभार मानले.
या समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद व आत्मविश्वास निर्माण झाला असून, शिक्षण क्षेत्रात श्रीराम विद्यालयाचे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.