मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यात शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने १८० हेक्टर क्षेत्रावर ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबागा लागवडी करण्यात येणार असल्याचे मावळ तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी ( Vadgaon Maval ) सांगितले.
ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील विविध भागात शेतकऱ्यांच्या माध्यमातून फळबागा योजना राबवली जाणार आहे त्यामध्ये आंबा, चिकू, नारळ,पेरू, फणस,चिंच, बांबू आदी फळ झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
Pavana Dam : पवना धरण ४८ टक्के भरले; मावळ परिसरात दमदार पाऊस
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन हेक्टरच्या खाली क्षेत्र असणे बंधनकारक आहे. त्यासाठी सातबारा उतारा,आठ अ उतारा, जॉब कार्ड झेरॉक्स,आधार कार्ड झेरॉक्स,बँक पासबुक झेरॉक्स एकत्रित खातेदार असल्यास बाकीच्यांचे संमती पत्र,ग्रामसभा ठराव आदी आवश्यक कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सादर करावीत अशी माहिती सहाय्यक, कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी ( Vadgaon Maval ) सांगितली.
तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्याला
१)खड्डे घेणे
२)खड्डे भरणे
३)कलमे रोपे लागवड करणे
४) कलमे रोपे खरेदी करणे
५) खते देणे
६)पीक संरक्षण करणे
७)झाडांना काटेरी कुंपण करणे
८) पाणी देणे
या बाबींसाठी शासनाकडून १००% अनुदान मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन कृषि अधिकारी साळे यांनी केले आहे.
ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर व शेताच्या बांधावर आंबा,चिकू, नारळ,पेरू,फणस,चिंच,बांबू आदी फळ झाडांची लागवड करावी असे आवाहन सहाय्यक कृषी अधिकारी विकास गोसावी यांनी केले ( Vadgaon Maval ) आहे.