मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ (Raj Thackeray) रविवारी झालेल्या इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून सरकारच्या हलगर्जी कारभारावर खरमरीत टीका केली आहे.
Ajit Pawar : दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
या दुर्घटनेत अनेक नागरिक जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून एक सखोल व थेट पोस्ट करत, “हा पूल जर जुना व धोकादायक होता, तर त्यावर पूर्ण प्रवेशबंदी का लावली गेली नाही? आणि तो पाडून नवीन पूल बांधण्याचे नियोजन का झाले नाही?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी दुर्घटनेतील मृतांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करताना सरकारच्या पोकळ आश्वासनांची चिरफाड केली. “प्रत्येक घटनेनंतर सरकार म्हणतं, बचावकार्य सुरू आहे आणि आम्ही बाधितांच्या पाठीशी आहोत… पण अशी वेळच का यावी?” असा संतप्त सवाल त्यांनी (Raj Thackeray) उपस्थित केला.
Pune : किल्ले सिंहगडावर विश्व हिंदू परिषदेतर्फे पालखी सोहळा थाटात
ते पुढे म्हणाले, “पावसाळ्यापूर्वी धोकादायक पूल, रस्ते यांची यादी करून, त्यावर दुरुस्तीचं नियोजन करणं हे सरकारचं काम आहे. पण जर प्रशासन दुर्लक्ष करत असेल, तर अनेक वर्षे सत्तेवर असलेल्यांनी त्यांच्याकडून ही कामं का करून घेतली नाहीत?”
राज ठाकरे यांनी नागरिकांनीही उत्साहाच्या भरात जीव धोक्यात घालू नये, अशी मोलाची सूचना केली. “अशा ठिकाणी जाताना आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला थोडं भान ठेवायला हवं. सरकार जबाबदारी झटकू शकत नाही, पण आपणही सतर्क राहायला हवं,” असं ते म्हणाले.
राज्यात पावसाळ्याची सुरुवात होताच, अनेक ठिकाणी पूर, खचलेले रस्ते, वाहून गेलेली वाहने आणि पाण्यात अडकलेले पूल यांची पुनरावृत्ती होत असल्याचे ते म्हणाले. “सरकारने आता तरी युद्धपातळीवर काम करायला हवं,” अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली.
या पोस्टमधून राज ठाकरे यांनी दुर्घटनेवर केवळ भावनिक प्रतिक्रिया व्यक्त न करता, शासन व प्रशासनाच्या अपयशावर बोट ठेवत जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. राज्यभरात ही प्रतिक्रिया चांगलीच गाजत असून जनतेच्या मनातील प्रश्न त्यांनी थेट शब्दांत मांडल्याचे दिसत (Raj Thackeray) आहे.