मावळ ऑनलाईन – सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं लोणावळा हे महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाचं हॉटस्पॉट मानलं जातं. याठिकाणी असलेलं भुशी धरण हे पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. यंदा केवळ जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात धरण भरून ओसंडून वाहू (Bhushi Dam Overflow) लागल्याने, पर्यटन हंगामास उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा धरण तब्बल १५ दिवस आधी भरलं आहे.
रेल्वे खात्याच्या अखत्यारीतील हे धरण ‘सत्यम, शिवम, सुंदरम’ या नावाने प्रसिद्ध आहे. पायऱ्यांवरून खाली कोसळणारं पाणी (Bhushi Dam Overflow), आजूबाजूचं धुक्याचं सौंदर्य आणि गार वाऱ्याची झुळूक यामुळे हे धरण प्रत्येक पावसाळ्यात हजारो पर्यटकांना आकर्षित करतं. शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांमध्ये येथे अक्षरशः जत्रेचं रूप धारण होतं.
Kundmala Accident Update : इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला; ४ मृत, ५१ जखमी, पाहा संपूर्ण यादी…
यंदा धरण १६ जून रोजी भरलं (Bhushi Dam Overflow) असून, २०२४ मध्ये ते ३० जूनला व २०२३ मध्ये १ जुलै रोजी भरलं होतं. यंदाचा पावसाळा दमदार असल्याने पर्यटनासाठी लोणावळ्याकडे मोठ्या प्रमाणावर पर्यटक वळण्याची शक्यता आहे.

पर्यटकांनी घ्यावी विशेष काळजी
तथापि, भुशी धरण परिसरात पाणी साचणे, ओल्या पायऱ्या आणि वाढलेली गर्दी यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे स्थानिक प्रशासन व पोलीस विभागाने पर्यटकांना (Bhushi Dam Overflow) काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
- धरणाच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना सावधगिरी बाळगावी
- मद्यपान करून पाण्यात उतरणे टाळावे
- लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे
- पाण्याच्या जोरात किंवा धबधब्याच्या खाली जाऊन फोटो काढण्याचे टाळावे
- प्रशासनाने घातलेल्या सुरक्षा जाळ्या, सूचना फलक यांचं पालन करावं
लोणावळा पोलीस व प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष योजना आखण्यात आली असून, पर्यटकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
पावसाळ्याचा आनंद घ्या… पण सुरक्षिततेची साथ सोडू नका!