Team MyPuneCity – राजकारणात व खेळात कधी काय घडेल कोणी सांगू शकत नाही असे भरत गोगावले यांनी सांगितले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने पारायण व अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शिवसेना नेते भरत गोगावले यांनी उपस्थिती लावली त्यावेळी ते बोलत ( Alandi ) होते.
Uma Khapre: ७०वर्षांनी खऱ्या लोकांना मोदी सरकारने न्याय दिला -आ.उमा खापरे
भरत गोगावले यांना पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाविषयीच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले,राजकारणात व खेळात कधी काय घडेल कोणी सांगू शकत नाही. सकाळ माणूस दुपारी कुठे असेल दुपारचा माणूस संध्याकाळी कुठे असेल हे सांगता येत नाही.अजित दादांनी जे वक्तव्य केले मुख्यमंत्री पदा बाबत कोणत्या ज्योतिषाकडे पाहिले असेल तर त्यांना विचारावे लागेल.पहिली युती झाली असेल तर शिवसेना व भाजपची नंतर ते वर्ष भरात ( Alandi ) मिळालेत. इच्छा प्रकट करणे अवघड बाब नाही.
Suhas Garud : राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी सुहास गरुड
संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, संजय राऊत ही वाजती घंटा आहे.सकाळचा भोंगा आहे. दररोज नवनवीन क्लुप्त्या काढत असतात.संजय राऊत यांचे बोलणे कोणी मनावर घेत नाहीत. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे चालवतात.
यावेळी त्यांनी इंद्रायणी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. नद्यांच्या काठी लोकसंख्या वाढली सांडपाणी थेट नदीत सोडलं जात आहे. इथं दुसरा पर्याय नाही.आम्ही यावर ठोस निर्णय घेऊ , सर्वांनी बसून यावर उपाय योजना करू,तरच सर्व नद्या स्वच्छ ( Alandi ) होतील.