situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : पाचव्या दिवशीही आगी मुळे कचरा डेपो परिसरात धुराचे साम्राज्य

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – आळंदी येथील कचरा डेपोला दि .२० रोजी दुपारी 3 च्या सुमारास भीषण आग लागली. त्या घटनेची माहिती अग्निशमन दलास स्थानिक ( Alandi ) नागरिकाने दिली.तत्काळ आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल गाडी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आण्याचे परिश्रम करत होते.

आगीचे स्वरूप मोठे असल्याने चाकण नगरपरिषद अग्निशमन दल, राजगुरूनगर नगरपरिषद अग्निशमन दल , वडगांव मावळ नगर पंचायत अग्निशमन दल व पिएमआरडी अग्निशमन दलाच्या गाड्याना पाचारण करण्यात आले. त्या घटना स्थळी पोहचत तेथील आग आटोक्यात आणण्याचे परिश्रम करत होत्या.

परंतु संध्याकाळी ७ ला अंधारामुळे तसेच कचरा डेपो येथील प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचे मोठे ढीग व त्या जवळील कचऱ्यास आग लागल्याने अग्निशमन दलाच्या ( Alandi) गाड्यांना आगीच्या ठिकाणी जाण्यास मोठा अडथळा नर्माण होत होता. यामुळे सायंकाळी ७ ला आग विझविण्याचे काम तूर्तास थांबविण्यात आले होते.तदनंतर दि.२५ पर्यंत अजून तेथील आग आटोक्यात आणण्याचे परिश्रम आळंदी अग्निशमन दल विभाग करत आहे.


कचरा डेपो येथील भाग हा डोंगराळ भाग आहे तसेच कचरा डेपो प्रवेशद्वारजवळील मोठ्या कचऱ्याच्या ढीगाची आग अजून आटोक्यात आली नसल्याने अग्निशमन दल ( Alandi) वाहन पुढे जाऊन पुढील आग आटोक्यात आणू शकत नाही.


कचरा डेपो वर ठिक ठिकाणी राखेचे ढीग व त्यामध्ये विस्तव असल्याचे चित्र दिसून येत आहे.कचरा डेपोतील कचऱ्याच्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निघत तेथील व आजूबाजूच्या परिसरात पसरत आहे.व मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे.स्थानिक शेतकरी म्हणाले आळंदी नगरपरिषद अग्निशमन दला सह अजून तीन ते चार अग्निशमन दल गाड्यांची आवश्यकता भासत ( Alandi) आहे.

कचरा डेपो वरील धूर लांबपर्यंत पसरत आहे.काही गुरे या डोंगर जवळील खालच्या परिसरात असतात तर काही येतात त्यांना सतत गेली ५ दिवस वायू प्रदूषणाचा त्रास होत आहे तसेच या वायू प्रदूषणाचा त्रास जवळील व दूरच्या नागरिकांना होत आहे.


बुधवार पासून मुख्य पाईप लाईनचे काम चालू होते, जल केंद्रात पाण्याचा पुरेसा साठा उपबद्ध नव्हता.मुख्य जलवाहिनीचे काम आज पूर्ण झाले आहे.तरीही काही पाण्याचे टँकर घटनास्थळी उपलब्ध करून देत आहोत.दोन दिवसात आग आटोक्यात आणू.असे आश्वासन संबधित अधिकाऱ्याने ( Alandi) दिले आहे.

Follow Us On